जलसंवर्धनाचा संदेश देत सोमठाण्यात युवा जल दिंडी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला....
जलसंवर्धनाचा संदेश देत सोमठाण्यात युवा जल दिंडी अभियानाचा शुभारंभ. तुळजाई न्युज : जालना, दि. १ जून २०२६ : माय भारत जालना, यशदा, युनिसेफ आणि पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमठाणा येथे युवा जल दिंडी अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पाणी बचतीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे अभियान दि. १ ते 5 जून २०२६ या कालावधीत बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. सदरील अभियानाचे आयोजन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षसंवर्धनाचा संदेश देत वृक्षाला जलदान करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोमठाणा गावाच्या सरपंच स्वाती नागवे, मयूरकुमार गोरमे जिल्हा युवा अधिकारी माय भारत जालना, सामाजिक कार्यकर्ते संतोष नागवे, उपसरपंच दिलीप मेंढरे, उपकृषी अधिकारी उमेश भोसले, उपकृषी अधिकारी गोपालदास जुंझारे, कृषी सहाय्यक अधिकारी रुपाली भोसले, जलसंधारण विभागाचे जिल्हा संसाधन व्यक्ती मनोहर सरोदे, प्रा. अमृत तार...




